Monday, October 29, 2012

Welcome to experience Nature gift , Authentic , Historical Tourism, Trekking & Mountain tour at Prabalmachi

WE ARE PROVIDING  FOOD , ACCOMMODATION & GUIDE SERVICE FOR THE KALAVANTIN DURG AND PRABALGAD PASSENGERS AT PRABAL MACHI VILLAGE .
Website : http://prabalgad.jigsy.com/     Email - neel.nilesh0506@gmail.com 
CONTACT NO- :08056186321, 08879473282,09209461474 ,08082649021
 


तुमच्या प्रतिक्रियेची गरज :-माझे नाव निलेश भुतांब्रे, प्रबळगडाच्या पायथ्याशी माझे गाव वसलेले आहे. शिक्षण क्षेत्रात पदवी घेणारा माझ्या गावामधून मी एकमेव आदिवासी मुलगा. हे गाव प्रबळगडाच्या ऐतिहासिक क्षेत्रात तर येतेच व निसर्ग सौंदर्यपूर्ण आहे.  गावाच्या वरच्या बाजूला प्रबळगड व त्याला लागुन कलावंती दुर्ग आणि आजूबाजूचा नैसर्गिक परिसर, विशेष करून या स्थानाकडे पर्यटकांचा वाढता कल आहे. त्याच बरोबर पर्यटकांची होणारी गैरसोय. हे सर्व बघायचे, आनुभवायचे तर दोन दिवस पाहिजे. मग रहायचे कुठे? खायचे काय? हे प्रश्नआहेतच. मग यावर उपाय म्हणून काही पर्यटक गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गवातामध्ये राहतात, काही तरी खाऊन कशीबशी रात्र काढतात? नाहीतर एका दिवसामध्ये कोणते तरी एक ठिकाण पाहून घरी जायचे हे पक्के. रात्री गावामध्ये रहाणारे ग्रुप बघितले तर ते फ़क्त पुरुषवर्गांचेच? फॅमिली व महिला असणारे ग्रुप फ़क्त दिवासाच पाहायला मिळतात. याचे कारण काय ? याचे कारण एकच की रात्री गावामध्ये राहाण्याची, खाण्याची-पिण्याची होणारी गैरसोय ? हा ऐतिहासिक भाग पूर्ण न करता तेथील आजूबाजूचा नैसर्गिक परिसराचा अनुभव घेण्याकरिता, नुसती पुरुषी पिकनिक न करता, फॅमिली, लेडीस, जेन्ट्स ग्रुप पिकनिक करण्याकरीता व रात्री गावामध्ये राहाण्या, खाण्याची-पिण्याची होणारी "गैरसोय" दूर करण्याकरिता.. पर्यटकांची पायपिट दूर करण्याकरिता... या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी मी गावामध्ये  दोन दिवस व एक रात्र  असे मिळून  ट्रेकिंग व सहल  प्याकज  पुरवत आहोत तसेच   हॉटेल आणि लॉगिंग सेवा  पुरवत  आहे. यासाठी मला तुमच्या मार्गदर्शनाची आणि तुमच्या प्रतिक्रियेची गरज आहे. त्यामुळे मी पर्यटकांना त्यांच्या इच्छेनुसार चांगली सेवा देऊ शकेन. मी तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघेन तसेच प्रस्ताव, सम्मोहन, संकेत पाठवण्याची कृपा करावी..


प्रबळगड आणि कलावंती दुर्ग बघितला आहे किवा पाहायचा आहे अशा हौशी पर्यटक मित्रांना, हा ट्रेक आणि निसर्ग सौंदर्यपूर्ण परिसर कसा अनुभवायचा? याच्याबद्दल माझे स्थानिक मत..
तुम्ही दीड तास पायपिट करून प्रबळ माची या गावामध्ये पोहचत. त्यावेळी तुम्ही खूप दमलेले असतात. मग कलावंतीण किवा प्रबळगडामधील एखादे ठिकाण बघून तुम्ही परत जातात. पण जर कलावंतीण तसेच प्रबळगड आणि आजूबाजूचा स्थानिक परिसर जर पूर्णपणेअनुभवायचा असेल तर मी एक स्थानिक म्हणून मार्गदर्शन नक्कीच देईन. तुम्ही एक रात्र गावामध्ये राहा. सकाळी माची गावामध्ये पोहचल्यावर चहा नास्ता करून कलावंतीण दुर्ग पाहायला जा आणि पुन्हा गावामध्ये आल्यावर गावाच्या उजवीकडे असणारे शिवशंकराचे मंदिर पाहू शकतात. गावाच्या कड्यावरून दिसणारा सुर्यास्त हे तर अदभूतपूर्व दृश्य आहे हे अनुभवा, संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पायखाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि त्यावर चमचमणा-या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. त्या सारखा आनंद जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स देऊ शकणार नाही. विशेषकरून गावाच्या कड्यावरून रात्री लग्नसराईच्या लाईटिंगच्या प्रमाणे चमकणारे मुंबई शहर, रसायनी, पनवेल आणि आजुबजुचा प्रदेश कसा नटलेला दिसतो. त्यामुळे असा भास होतो कि शाही लग्नाचा समारंभ आहे, संध्याकाळचा हाडं गोठवणारा गारठा, रानवारा. मग याच्यापुढे एसी नक्कीच फिक्का पडेल. पावसात कड्यावरून समुद्राकडे घाई-घाईने वाट काढत जाणारे धोधो कोसळणारे धबधबे, शिवाय दुसऱ्या दिवशी प्रबळगड ट्रेकला जा. प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा
जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेशमंदिर आहे. तसेच चार पाच पाण्याच्या टाक्यासुद्धा आहेत. प्रबळगडावर अनेक बुरुज आहेत. तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारखी ठिकाणी आहेत, काळ्याभूरुजावर एक मोठा चुन्याचा ढीग आहे. हा चुन्याचा ढीग भूरुज बांधण्यासाठी पूर्वी वापर करण्यात आला असेल असे वाटते. गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट जंगल असल्याने हे सगळे बघणे वाटाड्याची गरज भासते. गडावरून माथेरान, मोरबे धरण, तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारख्या ठिकाणाचे विविध पाँईंटस् फार सुंदर दिसतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड,कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडाचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तो विचार मागे पडला. हे सगळे पाहून झाल्यावर पुन्हा माचीगावात येऊन थोडा आराम करून संध्याकाळची बस पकडून परतीचा मार्ग धरावा. यामुळे तुमचा प्रबळगड आणि कलावंतीण ट्रेक तर होईलच पण आजूबाजूचा निसर्ग परिसराचा आनंद पण मिळेल. त्यामुळे ट्रेकच्या निमिताने एक पिकनिक चा अनुभव नक्कीच येईल असे मला तरी वाटते.

गडावर पोहचायचे कसे..

हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे जुन्या नॅशनल हायवेवर शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कलंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे जुना हायवे जोडला जातो. तेथे शेडुंग फाटा लागतो. शिवाय पनवेल वरुण (गांधी हॉस्पिटल) जवळ सहा आसनी मिनीडोर (टमटम) रिक्षा भाड्याने करुन ठाकुरवाडी गावामध्ये उतरावे. १० लोकांचे साधारणतः 200 -250 रुपये द्यावे लागतात.आणि दुसरा उपाय म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे . प्रत्येक व्यक्ति मागे 12 रुपये बसचे टिकीट आहे .ठाकुरवाडी पर्यंत आल्यावर तेथून तुमची प्रबल गडाकडे जाण्यासाठी पायी यात्रा सुरु करावी लागते.
प्रबळगड इतिहास..
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले. मुरंजन.बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात
घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी
झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.


History of Prabalgad:  This fort was built to keep an eye on the ancient ports of Panvel and kalyan situated in north konkan. From the study of the caves in this fort it is estimated that it belongs to the time of Buddha. Shilahar and Yadav made it army camp because of the strong manmade caves engraved in this fort and named it ‘Muranjan’. It was built at time of Bahamani Empire. Afterwards it came under ‘Nijamshahi of Ahmednagar’. When Nijamshahi was on the verge of collapse Shahaji Raja tried to save nijamshahi but Mughal Shahajahan and Adilshaha of Vijapur both send their army separately to defeat Shahaji. When Shahaji came to know this he moved to fort Kondhana and Murumbdev. After that he went to Siddhi of Janjira, who denied helping him against Mughal and Adilshahi, so Shahaji tried to get help from Portuguese of chaul, he too couldn’t helped him. Hence finally Shahaji, with his wife Jijabai and son young Shivaji moved on Muranjan fort along with army. Later in 1636 Shivaji left Muranjan fort. In the same year 1636 agreement of Mahuli was made according to which the North Konkan went under Mughal Empire but still Adilshaha of Vijapur was ruling the area, Shivaji grabbed this opportunity. He defeated More of Javli and capture Javli area. At the same time a brave sardar of Shivaji, Abaji Mahadev won the area of kalyan, Bhiwandi and Rayri. That time fort Muranjan came under swarajya of Shivaji. Shivaji changed the name of this fort from “Muranjan to Prabalgad “(prabal= strong) .later on in 1665 according to agreement of Purander, Prabalgad was one of the fort out of 23 which were handover to Mughal. Mughal sardar Jaysingh appointed a Rajput named Kesarsingh Hada on the fort Prabalgad. When agreement of Purander was busted Marathas took the fort once again. In doing so Kesarsingh was killed by Marathas. Before that Rajput ladies accepted to went on Johar. Mother and sons of Kesarsingh who were hidden on fort were freed by the order of Shivaji. In investigation of the fort Great amount of wealth was found.


कलावंतीण दुर्ग इतिहास.

हा दुर्ग मुंबई पुणे हायवेवरुन सहजपणे दिसतो. कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्यावर महल बांधला होता. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढ़ण्याकरिता खडक कापून पाय-या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नुर्त्य करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.
History of Kalavanti Fort:
This fort is just opposite to Prabalgad. It is also visible from Mumbai-Pune highway. According the stories, the fort was built for a queen named “Kalavanti”.For climbing this fort steps are cut in the rocks of the hill. From the peak of this hill you can see Matheran, chanderi, Peb & Ershal forts, Karnala fort &Mumbai city.
Buruj on Prabalgad
प्रबळगड भटकंती :-
Prabalgad Bhatkanti:
The flat top area of fort is covered by dense forest. There is a Ganesh Temple on the top also there are 2-3 water tanks, to explore them you will need a local guide. British government wanted to develop Prabalgad as a hill like Matheran but because of lack of water it was difficult so they give up this idea. Because of the dense forest it is difficult to see the walking ways but from top of the fort you can enjoy the sight of different points of Matheran.


Water tank (Houdh) on Prabalgad

माचीप्रबळ गाव  भटकंती :-

Fun at machi Vallage (Kharab  Ground)
Many waterfall side of  Machi Prabal Village
Myself is Nilesh Bhutambara from machiprabal village  we are providing Room service and Food Service. also we are accepted your order for food  service as per your requirement at Machi Prabal village for Prabalgad and Kalvantin Passengers.
Email: - neel.nilesh0506@gmail.com 
Contact No: - 08056182163, 09167014731,9209461474


Thursday, October 18, 2012

माझा एक संदेश माझ्या आदिवासी बांधवाना ...


माझा लेख प्रसिद्ध करून मला आदिवासी लोकांपार्येंत माझे विचार पोहचवण्यासाठी एक सुवर्णसंधी दिली त्याबद्दल प्रथम मी माझे सहकारी श्री गणपत जानू वारगडा (पत्रकार) याचे मनापासून आभार मानतो. आपण आपल्या समाजासाठी करत असलेले कार्य अतुलनीय आहे. याअर्थी तुम्ही विशेषअंक काढून माझे विचार आपल्या आदिवासी समाजापर्येंत पोहचवण्यासाठी एक फार मोठी संधी दिली आहे. आदिवासी सामाजिक जागरुकता करून त्यांच्या कौशल्याचा उपयोग आदिवासी विकासासाठी करून घेणे व आदिवासी विकासासाठी कार्य करणाऱ्या सर्व व्यक्ती व संस्था यांना एकाच मंचावर आणणे आहे. सामाजिक विकास हा कुणी एका संस्थेने, खात्याने किवा योजनेने होणार नाही. त्यासाठी सगळ्यांनी सोबत येऊन मेहनत घेणे गरजेचे आहे. तेवढेच ध्येय, दृष्टीकोन (विजन आणि मिशन) महत्वाचे आहे.आदिवासी विकासाचा विचार करता तेच प्रकर्षाने जाणवते, खूप साऱ्या संस्था, संघटना, समाजसेवक, शासकीय कर्मचारी आप-आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. पण जोपर्यंत आदिवासी युवकांमध्ये आणि समाजामध्ये विकासाबद्दल जाणीव होत नाही तोपर्यंत एकतर्फी विकास फक्त कागदावरच राहील. म्हणून आदिवासी तरुणांमध्ये आणि समाजामध्ये जागरुकता करण्यासाठी आणि सगळ्या आदिवासी संस्था, संघटना, समाजसेवक यांना एका व्यासपीठावर आदिवासी समाजाच्या भविष्याचा विचार करण्याकरिता मी हा संदेश देत आहे. आदिवासी समाज एक कुटुंब ही भावना तयार करून समाजात एकता आणणे महत्वाचे आहे. आणि हे सगळे कुणा एकाने शक्य नाही म्हणून सगळ्यांनी सोबत येऊन आपली आपल्या आदिवासी कुटुंबासाठी प्राथमिक जबाबदारी पार पडायची आहे . या भावनेने सामाजिक कार्यात सहभागी होणे अपेक्षित आहे त्यामुळे मी प्रथम तरुण वर्गाला पुढे येण्यास मन:पूर्वक संदेश पाठवत आहे .आदिवासी लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे त्यासाठी मार्गदर्शन व प्रचार करणे .धर्म, संस्कृती, कला, नृत्य, वाद्य, औषधोपचार यासारख्या गोष्टीचे महत्व आणि जाणीव टिकवून ठेवणे कर्म हीच पूजा असेल तर आपण आपले कौशल्य, वेळ, इ. आपला विखुरलेला आदिवासी समाज एक करण्याकरिता उपयोगात आणू या. आपल्या आदिवासी संस्कृतीला प्राधान्य देवून आपले उत्सव व परंपरा जपण्या साठी सुद्धा तितकीच मेहनत घेऊया.आदिवासी पर्यटक ठिकाणाची काळजी घेणे तसेच त्या इतिहासिक ठिकाणाचा विकास करणे आदिवासी जमिनीवर होणारी बेकायदा अतिक्रमणे,अनेक शासकीय नियमाचे उल्घन करून मिळणाऱ्या परवानग्या थांबवणे. योजनाची माहिती देणे व राबवून घेणे .आदिवासी जमातींमधील कुपोषण, दारिद्रय आणि एकंदर रोगराई या सगळ्याचे मूळ अज्ञानात आहे ते दूर करणे. ध्येयप्रेरित समाजसेवकांनी तसेच आपल्या तरुण युवक वर्गानी आदिवासी भागात ज्ञानगंगा पोहचवण्याचे अथक व अफाट प्रयत्न करावे . दुर्गम पाडय़ा-वाडय़ा-वस्त्यांवर विखुरलेल्या आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणणे, आदिवासींच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न करावे.आदिवासी शिक्षण, आरोग्य, भूमी, हक्क, रस्ते, विज, पाणी, सिंचन, स्वस्त दरात धान्य पुरवठा, घरकुल योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा, शबरी आदिवासी योजना यासारख्या अनेक शासकीय योजना नुसत्या कागदावर न राहता त्याचा फायदा गरजू आदिवासी लोकांना करून देणे. आजच्या स्पर्धेच्या युगात आदिवासी समाज जर टिकवून ठेवायचा असेल तर आणि त्यांचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर प्रथम आपला सुशिक्षित तरुण वर्ग पुढे आला पाहिजे.आपणही आपल्या समाजासाठी काही तरी करावे या दृष्टीने जर सुशिक्षित तरुण वर्ग पुढे आला तर खरंच आपल्या भावी पिडीचे भविष्य उज्वल होणार आहे . सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती आपलेसेपणाची भावना जपून आदिवासी लोकांना संगठीत करून जनजागृती करणे अपेक्षित आहे.


माझ्या आदिवासी शेतकरी बांधवाना एक संदेश ..


माझ्या आदिवासी शेतकरी बांधवाना एक संदेश ..
इडा पिडा टळू शेतकऱ्याचे राज्य येऊ दे ..एकीकडे आदिवासी समाजाला शासने वन हक्क कायदा करून वनाचे हक्क दिले तर दुसरीकडे आदिवासी बांधव आपली जमीन विकत आहेत. आपल्या वडीलपूर्वजाकडून मिळाली धरणी माता विकणे कितपत योग्य आहे. आजची आणि उद्याची परिस्थिती काय असेल? याचा थोडा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
आज औद्योगिकरण, शहरीकरण, प्रदूषण, लोकसंख्या वाढ, भस्मासूरासारखी वाढणारी महागाई, यासारख्या मोठ्मोठया समस्यानी माणसाला भेडसावून सोडले आहे. यामुळे पुढच्या भावी पीडिला खूप मोठया आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. यामधील सर्वात मोठी समस्या महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. थोडक्यात विचार केला तर यासारख्या समस्या वाढतच चाललेल्या आहेत. संशोधनानुसार येत्या २०२८ पर्येंत पेट्रोल, डीझेल, यासारख्या पेट्रोलियम पदार्थांचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. मग दळणवळण, मोठमोठे उद्योग, या मोठ्या समस्यांना सामोरे तर जावे लागेलच पण यामध्ये सामान्य माणूस भरडला जाणार आहे. शिवाय शेतकरी मोठ्या अडचणीत सापडणार हे नक्कीच. कारणआजचा आदिवासी शेतकरी आपली जमीन कवडी मोलाने विकत चालला आहे. पुढे शहरात गेलेला माणसांचा लोंढा पुन्हा गावाकडे येईल. त्यावेळी गावामध्ये फक्त शेतकऱ्यांचे जीवन राहिले असेल. कारण ज्याच्याकडे जमीन असेल तोच पुन्हा या जगावर राज्य करील. त्यावेळीच खरे जमिनेचे महत्व समोर येणार आहे. यासारख्या समस्यांना उत्तर द्यायाचे असेल तर त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे जमीन होय. मग आजचा आदिवासी कवडी मोलाने आपली जमीन का विकत आहे? थोडक्यात विचार करा. आज मुंबई किवा मुंबईच्या आजूबाजूला मोठ्मोठे व्यवसाय जोरात सुरु आहेत, नवनवीन कंपन्या, नवनवीन अनेक लहान मोठे उद्योगधंदे, औद्योगिकरण, शहरीकरण भरपूर वेगात चालले आहेत. जर आपल्या पनवेल मधीलच परिवर्तनाचे बोलायचे झाले तर अनेक प्रकारे औद्योगिकरण सहज पाहायला मिळते. पनवेल जवळ असलेल्या गावामधील परिवर्तन पाहायला मिळत आहे.अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन विकली. त्या जमिनीवर धरणे, बिल्डिग, शेतघर, ट्रान्सपोर्ट, गोडावून , अनेक लहान मोठ्या कंपन्या, यासारखे प्रकल्प उभे राहिले आहेत आणि भविष्यात अजून अधिक मोठ्या प्रकारचे औद्योगिकरण होणार आहे.आपल्या शेतजमिनीवर मोठमोठे व्यावसायिक नजरा ठेवून आहेत, त्याच प्रमाणे भविष्यात नवी मुंबाई विमानतळ, मेगासिटी यासारखे आंतरराष्ट्रीय व्यवसाय आपल्या जमिनीवर साकारले जाणार आहेत. या परिसराचा विकास झाल्यानंतर तेथील स्थानिक आदिवासींची काय अवस्था होईल, याचा विचार न केलेलाच बरा. जर सांगायचे झाले तर तुम्ही आपल्या वडिलधाऱ्या माणसाना विचारून पहा. यापूर्वी त्यांनी किती संघर्ष केला आहे हे समजून येईलच. याचे एक उदाहरण पूर्वी मोठ्या प्रमाणत सावकाराचे जमिनीवर राज्य होते. त्यामुळे त्यावेळी सावकार शेतकऱ्याकडून जमीन कसून घेत होता आणि झालेले पूर्ण पिक सावकार घेऊन जात असे. मग वर्षभर जमीन कसून शेतकऱ्याला त्याचे दारिद्रय, उपासमारी हेच नशिबी यायचे. मग उपासमारीला कंटाळून शेतकरी पुन्हा सावकाराकडे कर्ज किंवा अन्न सुगी म्हणून आणत असे आणि ती सुगी फेडण्यासाठी पुन्हा शेतकऱ्याला सावकारापुढे हातपाय पसरावे लागत. पुन्हा सुगीच्या रूपाने आपल्या आदिवासी लोकांचे मोठ्या प्रमाणात शोषण, मारहाण होत असे. आता झपाटयाने सुरु असलेल्या शहरीकरणामुळे मुंबईलगतच्या परीसरातील आदिवासींच्या जमीन, कवडीमोल भावाने खरेदी केल्या जात आहेत. त्यासाठी पैशांचे प्रलोभन वेळप्रसंगी दादागिरी करुन जमीन बळकावल्या जात आहेतिआदिवासींच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन आज आदिवासी बांधव आपल्या जमीनीवर परका होत चालला आहे. मग या सगळया परिस्थितीचा जाणीव असूनही आपण पुन्हा तीच चुक का करत आहोत? जर आपण आपली भूमिमाता वाचवली तरच आपली पुढची भावीपीडी वाचेल. नाही तर कालांतराने आदिवासी बांधवाना आपल्याच जमीनीवर परक्यासारखे रहावे लागेल. आजच्या घडीला राजकारणी आणि बडे व्यावसाकांनी संगनमताने मुंबईतील आरे कॉलनी, फिल्मसिटी आणि ठाण्याच्या येऊरमधील आदिवासींच्या जमीन कवडीमोलाने लाटून त्यांच्याच जमीनीतून त्यांना हदृपार केले आहे. आज ते एखाद्या परप्रांतीयासारखे जीवन कंठत आहेत.
त्यामुळे वेळेच सावध होऊन आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या जमीन विकू नयेत, अशी कळकळीची विनंती आहे.

आदिवासी सुशिक्षित तरुणाने राजकारणात येण्याची गरज .....

....आदिवासी सुशिक्षित तरुणाने राजकारणात येण्याची गरज .....
या लेख मध्ये मी सुशिक्षीत आदिवासी तरुणाने राजकारणात का यावे याची गरज काय आहे हे मी थोडक्यात सांगणार आहे. आपली प्रशासकीय विभागाबद्दल थोडक्यात माहिती लिहित आहे. जर प्रशासकीय विभागाचा आढावा घेतला तर आपण प्रथम ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिष यांच्याबद्दल माहिती देत आहे.
ग्रामपंचायत स्तर कार्येप्रणाली -
सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य ,ग्रामसेवक
तालुका स्तर कार्येप्रणाली -
पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, सहाय्यक अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी, तसेच पंचायत समिती सदस्य .
जिल्हापरिषद स्तर कार्येप्रणाली -
अध्यक्ष, उपाध्यक्ष ,बांधकाम व वित्त समिती सभापती, शिक्षण व आरोग्य समिती सभापती, महिला व बालविकास समिती सभापती, समाज कल्याण समिती सभापती ,स्थायी समिती, अर्थ समिती ,शिक्षण समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, आरोग्य समिती ,बांधकाम समिती ,कृषी समिती, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, समाज कल्याण समिती, महिला व बालविकास समिती, तसेच जिल्हा परिषद सदस्य .
अश्या प्रकारे प्रशासकीय कार्येप्रणाली आखलेली असते .त्याच या प्रत्येकी ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती स्तर ,जिल्हा परिषद स्तर विभाजन दिसते . प्रत्येक स्तरावर विभागानुसार योजना आखलेल्या असतात .
विभाग व योजना याची थोडक्यात माहिती -
१. सामान्य प्रशासन विभाग, २. जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभाग, ३.अर्थ विभाग, ४. महिला व बाल विकास विभाग, ५ ग्रामपंचायत विभाग, ६ आरोग्य विभाग, ७ कृषी विभाग, ८ पशुसंवर्धन विभाग, ९. शिक्षण (प्राथमिक) विभाग, १०. शिक्षण (माध्यमिक) विभाग, ११.बांधकाम विभाग, १२.समाज कल्याण विभाग, १३. ग्रामिण पाणी पुरवठा विभागअशी विभागीय कार्येप्रणाली असते. त्यानुसार प्रत्येक विभागानुसार योजना राबवल्या जातात .
थोडक्यात सांगायचे झाले तर या सगळ्या विभागीय योजनेचे फायदे करून घ्यायचे असतील तर आदिवासी सुशिक्षित तरुणाने राजकारणात येण्याची गरज तर आहेच. शिवाय अशा होतकरू सुशिक्षित तरुणाला राजकारणात येण्याची संधी द्यावी.

आदिवासी हाच खरा जंगलाचा राजा............


आदिवासी हाच खरा जंगलाचा राजा............

‘कुणब्याच्या जन्मा जाशील तर पेरू-पेरू मरशी,
वाघाच्या जन्मा जाशी तर तोलू-तोलू मरशी
पन् काथोड्याच्या जन्मा जाशी तर जंगलाचा राजा होशी’
अशी एक म्हण कातकरी जमातीत प्रचलित होती. तसे पाहायला गेल्यास सर्वच आदिवासी जमातींना आपल्या जंगलावरच्या स्वामित्वाबद्दल अभिमान असतो; आदिवासी या शब्दातच भारतातील आदिवासी जमातींचे आदिम तत्त्व सामावलेले आहे; त्यामुळे आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतात. आदिवासींचा वनावर आधारित औषधोपचार . आदिवासींचा वनांवरील वंशपरंपरागत हक्क आहे. ‘जंगलातील करवंद, आलीव, रानकेले, जांबुल, तोरणे, उंबर यासारखी फळे, चिकटीकंद, लवडीकंद, हलिंदकंद, कादुकंद, गोडकंद, चाईकंद यासारखी अनेक कंदमुळे, पाचागलीभाजी, कोलीभाजी, कोबडीभाजी, कुर्डूभाजी यासारख्या अनेक पालेभाज्या तसेच रानहळद, कर्जाच्या शेंगा, जंगलातील शिकार यासारख्या रानमेव्यावर खरी आदिवासी उपजीविका तर आहेच. शिवाय पूर्वी पासूनच आदिवासी अनेक प्रकारचे व्यवसाय हे जेगलावरच अवलंबून आहेत. परंतु इंग्रजांच्या आगमनापासून आदिवासींना जंगलातून हुसकावून लावण्यात आले आणि त्यांच्या जगण्याचा आधारच तुटला. 1861 मध्ये ब्रिटिश लॉ अॅ ण्ड रेव्हेन्यू सुपरिटेंडेंड वेडन-पॉवेल याने सर्वप्रथम देशात वन कायदा लागू केला, लेखणीच्या एका फटका-यानिशी त्याने भारतातील सर्व जमीन व जंगले इंग्रजांच्या मालकीची केली. त्याचा सगळ्यात जास्त फटका आदिवासींना बसला. परंतु आजही परिस्थिती बदललेली नाही. केंद्रीय आदिवासी विकास मंत्र्यांनी 17 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ‘वन हक्क कायदा’ कसा राबवावा, याचे निर्देश दिले आहेत. तेच निर्देश आदिवासींशी संबंधित सगळ्याच योजना वा कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी योग्य वाटतात. आदिवासींचा वनांवरील वंशपरंपरागत हक्क मान्य करून सरकारने त्यांना उपजीविकेसाठी ‘एक साली प्लॉट’ देण्याची तरतूद या वनहक्क कायद्यात आहे. ज्या आदिवासी कुटुंबाकडे त्या जमिनीचा ‘ताबा’ असेल, त्या वनखात्याच्या मालकीच्या जमिनीचे एक वर्षासाठी आदिवासी व्यक्तीकडे हस्तांतरण होते. त्या जागेला ‘एक साली प्लॉट’ म्हणतात; परंतु या कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्यामुळे आदिवासींचा वनांवरचा हक्क नाकारला जात आहे, ,‘जंगलातील फळे,कंदमुळे, बी-बियाणे आदींवर उपजीविका चालवण्याचा आदिवासींना हक्क मिळावा तसेच जंगलामध्ये त्यांना कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रवेश मिळावा ‘वनहक्क कायद्या’ची योग्य पद्धतीने अमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभांच्या अधिकारात लवचिकता आणावी, जनजागृतीची माध्यमे अधिक प्रभावी करावी, यासोबत वनविभाग आणि अन्य संबंधित सरकारी खात्यांकडून केली जाणारी फरफट थांबली पाहिजे , असे स्पष्ट निर्देश या पत्रात दिलेले असूनसुध्दा, हे सगळे होत नसल्यामुळे खूप मोठय़ा प्रमाणात जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा वनाधिका-यांकडून छळ होत आहे. त्यांना त्यांच्या जागेतून हुसकावून लावण्यात येत आहे. कित्येक आदिवासींची तर त्यांच्याच जागेतून बेकायदेशीरपणे हकालपट्टी झालेली दिसते. निव्वळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासींच्या हक्काचा सन्मानही राखला जात नाही, तर या अशा जुलमी पद्धतीने जंगल, ज्यावर आदिवासी जगत होते, ते हिरावून घेतले, देशातील हजारो एकर जंगल अगदी नष्ट केले होते. आजही देश स्वतंत्र होऊन सहा दशके उलटली तरी ही विस्थापनाची प्रक्रिया थांबलेली नाही. बिरसा मुंडांप्रमाणे अनेक नेत्यांनी आदिवासी तरुणांना स्वातंत्र्य आणि स्वराज्याची अंमलबजावणी पूर्ण करण्यास प्रवृत्त केले होते. अनेक प्रकारच्या, फसव्या गोष्टी सांगून आजही आदिवासींची दिशाभूल केली जात आहे थोडक्यात काय तर जंगलात होणा-या चकमकींत दोन्ही बाजूकडून मरणारा आदिवासीच असतो. गायरानाच्या हक्क आदिवासींची जमेल तशी दिशाभूल करत आहे. यासाठी शिकले, सवरलेले, आर्थिकदृष्टय़ा, राजकीयदृष्टय़ा सक्षम बनलेले लोक पुन्हा आपल्या पाडय़ावर परत आले पाहिजेत. वयोवृद्ध वडील जुना काळ आणि नवीन बदल याबद्दल बोलताना फार चांगले वर्णन करतात ‘पूर्वी आदिवासी जंगलावर अवलंबून होता, आता तो सरकारी सबसिडींवर अवलंबून आहे. ज्यावेळी आपण स्वावलंबी होऊन त्यावेळीच अपली प्रगती होईल